काही दिवसांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहामधे यू–टर्न हे नाटक पाहण्याचा योग आला. लेखन, दिग्दर्शन आणि गीते आनंद म्हसवेकर यांनी केली आहेत. नेपथ्य राजन भिसे आणि संगीत अवधूत गुप्ते यांच होत. दोन पात्रीच नाटक आहे…गिरीश ओक आणि ईला भाटे…. नाटक कोणत्यातरी गंभीर विषयावर असणार हे ग्रुहितच धरल होत…तिकिटावर नाटकाच हेडिंग “स्त्री–पुरुष नात्यामधील गोड गुंता” अस दिलं होत….एक घटस्फ़ोटीत आर्मी मधील रीटायर मेजर जो एका companion च्या शोधात असतो…त्यासाठी तो रीतसर वर्तमान पत्रामधे जाहिरात ही देतो..आणि एक विधवा पन्नाशीकडे झुकलेली स्त्री सौ. रमा गोखले जिचा मुलगा नोकरीनिमित्त लंडनला असतो. ही बाई पन्नाशीकडे झुकलेली असली तरी तिचा उत्साह, तिचा अवखळपणा हा मात्र एका सोळ्या वर्षाच्या मुलीसारखाच…लाफ़्टर क्लब ला जाऊन सतत हसण्याची सवय, टिपिकल पुणेरी संस्कार आणि बायकांमधे असते तशीच युक्तीवाद करण्याची लकब… मेजर वैद्य मात्र याहून अगदि भिन्न. आर्मीत असल्यामुळे शिस्तप्रिय आणि बेशिस्त सिविलीयन्सचा राग करणारे. वरकरणी रागीट वाटणारे व्यक्तीमत्व. अनायसे या दोघांची भेट होते…त्यांनी एकमेकांबद्दल प्रथमदर्शनी बनवलेली मते…मग हळू हळू त्या वरकरणी व्यक्तिमत्वातून खोलवर डोकावणारी त्यांची मने जुळतात ती फ़क्त एकाच साम्य गोष्टीमुळे आणि ती म्हणजे “एकटेपणा“. आणि मग हे दोघे एकमेकांचे “COMPANION” होण्याचा निर्णय घेतात. एकमेकांची सोबत त्यांच्या आयुष्याला एक वेगळ वळण देते..पण दोघांच्यांही मुलांना त्यांचा हा निर्णय मान्य नसतो आणि त्यातून मग त्यांच्यातील पालकाची त्यांच्याच मुलांनी केलेली हार आणि झालेली भावनीक गुंतागुंत यावर हे नाटक बेतलेलं आहे. दोन्ही पात्रांचा अप्रतिम आणि संवेदनशील अभिनय कथा अधिकच रंगवतो. मध्यंतरापूर्वीचा एक भाग थोडा मंद वाटतो आणि पुढे काय होईल याची फारशी उत्सुकता जाणवत नाही कारण सर्वसाधारणपणे आपण अंदाज बांधायला सुरुवात करतो आणि कथा तशीच पुढे सरकते. या नाटकातील काही वाक्ये विचार करायला प्रव्रुत्त करतात. नायिकेला डायरी लिहिण्याची सवय असते. मेजरला पहिल्यांदा भेटल्यावर ती त्यांच्याबद्दल आपल्या डायरीमधे लिहीते : “काटे असणारया बरयाचशा वनस्पती या फ़क्त वाळवंटात असतात आणि त्याही वाळवंटाएवढ्याच रुक्ष समजल्या जातात…निवडुंगाला आपल हिरवेपण टिकवून ठेवण्यासाठी काटे असतात पण मग सुंदर अशा गुलाबाला का म्हणून काटे असावेत??? आणि त्याला काटे असले तरी त्याची बरोबरी निवडुंगाशी नाही करता येणार.” कठोर आणि रुक्ष वाटण्यारया मेजर ची द्रवलेली बाजू जेव्हा ती पाहते तेव्हा ती लिहिते ..”वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या कातळालाही पाझर फुटतो..आणि वठलेल्या व्रुक्षालाही जेव्हा पालवी फुटते तेव्हा प्रश्न पडतो की जर पुन्हा पालवी फुटायचीच होती तर तो व्रुक्ष वठलाच का???”सरतेशेवटी जेव्हा आपल्या मुलाच्या आणि मेजरच्या मुलीच्या नाराजीपुढे नायिका झुकते तेव्हा ती मेजर ला सोडून जाण्याचा निर्यण घेते आणि मग मात्र मेजर अगतिक होतो आणि अव्यक्त शब्दात नयिकेला नजरेतूनच सांगून जातो की ” मला तूझी सोबत हवी आहे आणि तूलाही माझी” आणि जाताना तो तिला सांगतो “आज तू हा निर्णय घेतलास पण पुढे जर कधी तुला माझी साथ हवीशी वाटली तर स्वतावर अन्याय करू नकोस” हे वाक्य ऐकून नायिका दारापाशीच थांबते…ती पुढे यू–टर्न घेऊन नायकाकडे परतेल का? हा प्रश्न लेखकाने अनुत्तरीच ठेऊन नाटकाचा अंत केलाय.आपली पिढी कितीही पुढारलेल्या विचारांची असली तरी एक स्त्री आणि पुरुषामधे शारीरिक ओढी शिवाय एक मानसिक ओढही असू शकते हे समजायला आपण अजुनही कमी पडतो. वयाच्या एका विशिष्ठ वळणावर जर आपला जोडीदार आपल्या बरोबर नसेल तर जिवनाला आलेली पोकळी भरून काढणे हे केवळ अशक्यच..आणि जर ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला तर लोकं काय म्हणतील आणि त्याहीपेक्षा आपलीच माणसं काय म्हणतील? या विचाराने आपण स्वताचीच केलेली घुसमट आपल्याला एक असंतुष्ट आयुष्य जगायला भाग पाडते. प्रेम आणि हव्याहव्याशा वाटणारया सहवासाची ओढ ही फ़क्त तरुणाईतच असावी किंवा असली पाहिजे हे अगदि चुकीच विधान आहे…आणि या भावनांना वयाच बंधन नसतच मुळी…मग ती स्विकारण्यासाठी ते बंधन का असावं??
यू-टर्न
02 शुक्रवार एप्रिल 2010
Posted Uncategorized
in