• मी कोण ?

थेट दिल से

~ मनापासून

थेट दिल से

Monthly Archives: मे 2010

सूत्रसंचालन

26 बुधवार मे 2010

Posted by truptisalvi in येता-जाता

≈ 19 प्रतिक्रिया

आजकाल डेली सोप सोबतच बरेचसे talent shows, reality shows टेलीवीजन मिडीया वर सुरू असतात. मालिकांबरोबरच अशा कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्गही दांडगा आहे. मग अशा कार्यक्रमांची संकल्पना, त्यांचे स्पर्धात्मक स्वरूप इत्यादी गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पण मला त्यातील सूत्रसंचालन किंवा anchoring हा भागही महत्वाचा वाटतो. काहीजण इतक्या छान पद्धतीने कार्यक्रमाची आणि प्रेक्षकांचीही पकड घेतात तर काही वायफळ बडबड करून वैतागही आणतात.

काही उदाहरणच द्यायची झाली तर…मराठी सा रे ग म प ची निवेदक पल्लवी जोशी..तशी ती बरयाच वर्षांपासून सूत्रसंचालन करते. पण तीचा पल्ला “एकदा जोरदार टाळ्या होउन जाऊ देत” याच्या पलिकडे काही जात नाही. तीने या कार्यक्रमाद्वारे दोन ट्रेड मार्क केलेत…एक म्हणजे तीचे हे पेटंट वाक्य आणि दूसरं म्हणजे कुठल्याही साडीवर विसंगत ब्लाऊज घालणे. ती संवाद विसरली कि “अमुक साठी जोरदार टाळ्या..तमुक साठी जोरदार टाळ्या” एवढच बोलते. मला मान्य आहे तिला स्क्रिप्ट मिळत असावी पण त्यात तोच तोच पणा आहे हे तीला कळू नये? कबूल आहे कि मुख्य कार्यक्रम गाण्यांचा असतो..तेव्हा फोकस त्याकडे असायला हवा..पण ही मधे मधे येऊन निव्वळ टाळ्या वाजवायला सांगून प्रेक्षकांच्या तोंडाला न्हवे तर हाताला फेस आणते. तीच्या प्रत्येक वाक्यानंतर पुढच वाक्य इतक predictable असत की मी चक्क टि.व्ही म्युट करते. मला हे सुद्धा मान्य आहे की २ मिनिट कैमेरासमोर किंवा व्यासपीठावर उभ राहून निवेदन करायला खूप धाडस लागत..आणि कुणीही ऐरा गैरा नत्थू खैरा ते करू शकत नाही. पण आता इतकी वर्षे टेलीविजन मिडिया मधे काम केल्यानंतर यांनी थोडं आत्मपरिक्षण करायला नको का???

काही महिन्यांपूर्वी सलील कुलकर्णी्ंच्या “आयुष्यावर बोलू काही” हा गाण्यांच्या सुरेख कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आमच्या एका स्वय़ंचलित संस्थेमार्फ़त हा कार्यक्रम मागील ३ वर्षे सलग भरवला जातोय. सुरूवातीची २ वर्षे संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांनी एकत्र हा कार्यक्रम केला होता. तिसरया वर्षी मात्र संदीप खरे न्हवते, पण सूत्रसंचालनासाठी सुनिल बर्वे आले होते. मी स्वत: कार्यक्रमाची सुरूवात, पाहूण्यांची ओळख करून कार्यक्रमाची सूत्र सुनिल बर्वेंच्या हातात दिली. पण स्टेजवर त्यांचा प्रेझेन्स जाणवतच न्हवता. सुनिल सलिलला प्रश्न विचारणार आणि सलिल त्यांची उत्तर देत देत गाण्याचा कार्यक्रम पुढे नेणार अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. पण सगळा कार्यक्रम सलिलनेच खाऊन टाकला आणि सुनिल फक्त गाण्यांना कोरस देण्याचे काम करत होते आणि सुनिलचे निवेदन सपशेल फसले.

ई-मराठीवर एक विनोद वीरांचा कार्यक्रम लागतो: “कोमेडी एक्सप्रेस” त्याचे निवेदन अम्रुता खानविलकर करते. तिच्याबद्दल मी इथे काही लिहिणे पण जागेचा अपव्यय वाटतो मला. तीचे ते एकसूरी (किंचाळणे) निवेदन म्हणजे त्या कार्यक्रमाला लागलेले गालबोट वाटते. तिने “महाराष्ट्राचा सूपरस्टार” या झी मराठी वरील स्पर्धेचे पण निवेदन केले होते..तेसुद्धा त्याच सूरात…

वरील उदाहरणांवरून मला चांगले निवेदक कधी सापडलेच नाहीत असे मुळीच नाही. रेणुका शहाणेचा “सुरभी” पासून ते “याला जीवन ऐसे नाव” पर्यंतचा प्रवास आपण पाहीला तर तिने किती सुंदर रीत्या निवेदनाचे पैलू उलगडले आहेत हे कळेल. तिचा तो सुरभीमधला निरागसपणा अजूनही टिकून आहे. संपदा कुलकर्णीचेही निवेदन छान वाटते. प्रशांत दामले…एक उत्तम विनोदी अभिनेता… आणि उत्तम निवेदकही…हल्ली एक पाक-क्रुतीचा कार्यक्रम सुत्रसंचालित करतो. अगदी रोज पाहिल तरी त्याची हाताळणी कंटाळवाणी वाटत नाही. (हा प्रत्येक पदार्थ टेस्ट केल्यावर त्याच्या चेहरयावर उमटणारे भाव थोड्या फार फरकाने सारखेच असतात 🙂 )

अनू कपूर हाही एक उत्तम निवेदक आहे..”मेरी आवाज सूनो”, “झी अंताक्षरी”, “स्मार्ट श्रीमती” सारखे कित्येक कार्यक्रम त्याने इतक्या सुरेखरीत्या सादर केले आहेत….त्याच्या निवेदनामधे कमालीचे वैविध्य सापडते आणि त्यामागे त्याचा अभ्यासही दिसून येतो. एके काळी सोनू निगमने हिंदी सा रे ग म प गाजवले होते…त्याची परंपरा शाननेही बरयापैकी राखली. आपले आदेश भाओजी…वहिनी वहिनी करत महाराष्ट्राच्या घरा घरामध्ये शिरले आणि समस्तांच्या मनामधेही. मध्यंतरीच्या काळात जेव्हा भाओजी निवडणूकीच्या रिंगणात उतरले तेव्हा त्यांच्या दोन कार्यक्रमात replacement झाल्या..जितेन्द्र जोशी आणि निर्मीती सावंत…पण आदेश सारखी कामगिरी कुणीही पार पाडू शकल नाही. भाओजी तिथे रिंगणात आपटले आणि इथे त्यांच्या कार्यक्रमांचा टि.आर.पी.

सगळ्यांना कळलं “ज्यानू काम त्यानू…दूजा करे सो गोते खाय.”

अमिताभ बच्चन सारखा एक उमदा कलाकार जेव्हा या क्षेत्रात येतो आणि करोड्पतीसारख्या कार्यक्रमाला लोकप्रियतेच्या अत्त्युच्च उंचीवर नेऊन ठेवतो तेव्हा अगदी गोविंदा, अनुपम खेर, शाहरूख खान पर्यंत सगळे त्याच रिंगणात हात पाय मारून बघतात…. पर ये सबके बसकी बात नही…..

आज काल वी.जे, आर. जे यांच पीक आलय…त्यासाठी talent hunt सुद्धा होतात..पण प्रकर्षाने लक्षात राहील असा एखादाच. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आणि प्रेझेन्स ओफ माईंड सगळ्यांकडेच नसतो.

 

ता.क.: काही कंटाळवाण्या आणि ईरिटेटींग निवेदकांनी मल ही पोस्ट लिहिण्यास उद्युक्त केल्याबद्दल त्यांचे आभार. 

वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक असून कुणाबद्द्लहि वैयक्तिक आकस नाही. 🙂

 

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

मुंबई मराठी ब्लोगर्स मेळावा २०१०

11 मंगळवार मे 2010

Posted by truptisalvi in Uncategorized

≈ 13 प्रतिक्रिया

पुण्याच्या यशस्वी ब्लोगर्स मेळाव्यानंतर, मुंबई मधील काही ब्लोगर्स मित्रांमधे असा मेळावा मुंबई मधेही आयोजित करण्यात यावा अशी कुणकुण सुरू होती… बरयाच ब्लोगर्सनी या प्रस्तावासाठी आपल्या माना डोलावल्या. हळू हळू बरयाच चर्चा सत्रांनंतर आणि ब्लोग दुनियेतील काही जुन्या जाणत्या माणसांनी पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित करण्याचा आराखडा आखला. तारीख आणि जागा ठरली आणि नेटभेट, मराठी ब्लोग विश्व सारख्या ब्लोगींग साईट्स वर जाहीर निमंत्रण करण्यात आले. 

 या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कांचन कराई, महेन्द्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी हे होते. कांचन ताईने स्वत: सर्व ईच्छुक ब्लोगर्सना मेल पाठवल्या, त्यांच्या शंकाच समधान वैयक्तिक रित्या केलं…तिचा उत्साह तीने पाठवलेल्या मेल्स आणि निमंत्रण पत्रिकेमधून झळकत होता. बरयाचशा पडद्यामागच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. त्याबद्द्ल त्या सर्वांचे अभिनंदन.

 ९ मे २०१०…कार्यक्रम स्थळी अर्थात दादर पश्चिम येथिल “दादर सार्वजनिक वाचनालय” इथे जाण्यासाठी मी बाहेर पडले आणि कळलं की मेगाब्लोकमुळे रेल्वे गाड्यांचा गोंधळ सुरु आहे. अपेक्षे पेक्षा आपण उशिरा पोहचणार याची मला कल्पना आली. मी जेव्हा पोहोचले तेव्हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. ओळख सत्र सुरू होते. सर्व उपस्थित ब्लोगर्स आपली आणि आपल्या ब्लोग ची ओळख करून देत होते. मी सभाग्रुहात पोहोचताच तिथल्या कार्यकर्त्यांनी मला माझ्या सांकेतिक कोड नुसार असलेला बैच दिला. मी पटकन जाऊन पंख्याखालची खुर्ची पकडली. सहजच एक नजर सभाग्रुहावरून फिरवली तर लक्षात आले कि छोट्या आर्यन पासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंतच्या सर्व वयोगटातील ब्लोगर्सनी हजेरी लावली होती. ओळख सत्र पार पडत होते आणि दरम्यान गरमागरम बटाटेवडे आणि कटलेट पण सर्व्ह होत होते. काही वाचकांनीही यात उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवून आपली मते मांडली.

 त्या नंतर एक लकी ड्रो आयोजित करून तीन ब्लोगर्सना सलिल चौधरी (नेटभेट चे संचालक) यांच्या हस्ते पुस्तके प्रदान करण्यात आली. माफ करा..पुस्तकाचे नाव आठवत नाहीये.

 त्यानंतर चर्चा सत्र सुरू झाले. ब्लोगींगमधील काही तांत्रिक अथवा ईतरही काही अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. हे फारच उपयुक्त सत्र वाटले. दरम्यान उरलेल्या बटाटेवड्यांवर काही खवय्यांनी आडवा हात मारला 😉  चर्चासत्र रंगले असतानाच श्री. मिलिंद वेरलेकर पुण्याहून आले. त्यांनी राजा शिवाजी डोट कोम या त्यांच्या आगामी जगातील सर्वात मोठ्या web-encyclopedia ची सविस्तर माहिती सांगितली. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याबद्दल असलेला अभिमान त्यांच्या संभाषणातून झळकत होता. मला खूप कौतुक वाटले त्यांचे.

रात्री ८-८.१५ च्या आस पास कांचन ताईने औपचारिकपणे कार्यक्रम संपल्याची घोषणा केली पण तरीही चर्चा सुरूच होती. आणि पुन्हा एकदा असा मेळावा नव्हे संमेलनच भरवण्यात यावे असे सर्वांचे एकमत झाले. त्यानंतर समूह चित्र अर्थात ग्रूप फोटो चा कार्यक्रम झाला. आणि हळू हळू सर्व एकमेकांचे निरोप घेऊन घरी जाऊ लागले.

एकंदरीतच माझ्यासारख्या नवख्या ब्लोगर ला हा सोहळा आणि ईतर ज्येष्ठ ब्लोगर्स चे लाभलेले सान्निध्य हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  

 

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

ग्रीष्मातला पाऊस.

01 शनिवार मे 2010

Posted by truptisalvi in लघुकथा

≈ 8 प्रतिक्रिया

ऊन्हाळ्याचे दिवस होते. रेडिओवरील ’उठी उठी गोपाळा’ च्या गजरामुळे पहाटेच साखरझोपेने डोळ्यांना सुटी दिली आणि मी रेल्वेच्या टाईमटेबलप्रमाणे अनियमित असाणारया माझ्या प्रभातफेरीला बाहेर पडले. बागेतील शुद्ध हवेचा आस्वाद घेत असतानाच अचानक एका आवाजाने मी थबकले. त्या आवाजाच्या दिशेने गेले आणि तेथील द्रुश्य पाहून चकित झाले. दहा बारा व्रुद्ध मंडळी गोलकार वर्तुळात उभे राहून मोठमोठ्याने हसत होती. त्यांच हसण हे तात्काळ तर्कशुद्ध वाटत नसल तरी तो “लाफ़्टर थेरेपी’ नावाचा व्यायामाचा एक प्रकार आहे हे माझ्या लक्षात आलं.

पण का कुणास ठाऊक सुरकुतलेल्या ओठांवरच ते अकारण हसू माझ्या मनाला एक समाधान देऊन गेलं. आणि मग मी प्रभातफेरीच्या निमित्ताने ज्येष्ठांच्या हास्यसंमेलनाला नेमाने बघ्याची उपस्थिती लाऊ लागले.

त्या दिवशी रविवार होता. पण माझ्या कुंभनिद्रेने घड्याळाच्या कर्णकर्कश्श गजरालाही दाद दिली नाही. उठायला जरा उशिरच झाला. मी कशीबशी लगबगीने बागेत पोहोचले. तोवर सारी व्रुद्ध मंडळी लाकडी बाकांवर विसावली होती. आतापर्यंत त्यातील बरीच जणं माझ्या परिचयाची झाली होती. त्यांच रोजच हसू मी मनसोक्त प्राशन करायचे आणि उगाचच तरतरीत झाल्यासारख वाटायचं. आज मात्र माझ “एनर्जी ड्रिंक” हुकलं म्हणुन मी मनातच फ़ार चुकचुकले.

इतक्यात अचानक हवेत गारवा आला. पावसाचे शितल टपोरे थेंब जणू धरतीच्या स्पर्शासाठी आसूसले होते. तळपत्या ग्रीष्मातली ती पहिलीच सर. अचानक वास्तवाचे भान आले आणि सारी व्रुद्ध मंडळी एका पत्र्याच्या शेडखाली जाऊन बसली…मी ही आत शिरले.

नजर वर करून पाहील तर पावसाकडे एकटक पाहत असलेले जोशी आजोबा दिसले. कसल्यातरी विंवचनेत असल्यासारखे वाटले. इतरांनी विचारणा केल्यावर ते त्यांना काहितरी सांगू लागले आणि कुतुहल म्हणून मी पण त्यांच्या संभाषणाला आपले कान लावले. जोशी आजोबा सरकारी नोकरीत होते. मुलाला मोठ्या प्रयत्नांनी आपल्याच सेक्शनमधे चिकटवले होते त्यांनी. त्याच्या दोन बेडरूम किचनच्या जागेसाठी आपली आयुष्यभराची जमा पुंजी घातली आणि मोबदल्यात त्यांना मिळाला तो त्याच जागेतील एक दुर्लक्षित कोपरा. त्यांना धीर देत रानडे आजोबा आपली व्यथा सांगू लागले. त्यांचा चौदा वर्षांचा नातू त्यांचा अगदी जीव कि प्राण पण तो मात्र त्यांना दुर्लक्षित करतो, टाळतो. त्यांच्याबरोबर कुठेही जायला यायला त्याला लाज वाटते. त्याच्या ह्या अशा वागण्यामागचं प्रश्नचिन्ह त्यांना सतत भेडसावतं. प्रभू आजोबा मात्र त्यातल्या त्यात समाधानी वाटले. स्वत:हूनच मुलाचा संसार वेगळा थाटून दिला. आता मात्र छायागीताप्रमाणे दर रविवारी नातवंडांना भेटायला जातात. सावंत आजी सिजनल आहेत. सावंत आजोबा निवर्तल्यावर दर चार महिन्यांनी त्यांची रवानगी एका लेकाकडून दुसरयाकडे आणि दुसरयाकडून तिसरयाकडे होते. त्यामुळे पावसाळा थोरल्याकडे, हिवाळा मधल्याकडे तर उन्हाळा धाकट्याकडे. पवार आजोबांची तर याहूनही वाईट अवस्था. ईस्टेटी बरोबरच मुलांनी आईवडिलांची सुद्धा वाटणी करून घेतली. सहा सहा महिन्यांनी लाकडी फर्निचर प्रमाणे आईवडिलांची अदलाबदल होते. नेने आजोबा सगळ्यात श्रीमंत, अडिच हजार चौरस फुटाच्या जागेत फ़क्त ईन-मीन-तीन माणसं राहतात. आजोबा, आजी आणि एक गडी. नेने आजोबांचा मुलगा परदेशात ईंजिनियर आहे. नोकरीनिमित्त तिथे गेला आणि आता तिथलाच झाला. खोरयाने पैसा ओढतो आणि न चुकता आई-वडिलांना पाठवतोसुद्धा. पण अखेरीस ठेच लागली तर जखमेला मलम नको पण हाकेला ओ देण्याइतपत तरी त्याने जवळ असावे इतकीच त्यांची माफक अपेक्षा.

कुणाला जवळ पैसा नाही म्हणून आपल्या व्रुद्ध भविष्याची काळजी, तर कुणाला कधी व्रुद्धाश्रमात पाठवणी होईल याची विवंचना, कुणाची ज्येष्ठ नागरीकांच्या सवलती मिळाव्यात म्हणून धडपड, तर कुणाची वेळ जात नाही म्हणून तक्रार. कुणाला प्रक्रुती साथ देत नाही तर कुणाला नशीब. आणि मुख्य म्हणजे कदाचित आता आपल्यावाचून कुणाचं अडतं नाही ही भावना त्यांना सलत असते.

त्या सगळ्यांची कहाणी ऐकून वाटलं रोज जे हसू मला टवटवीत करायचं ते किती वरपांगी आणि पोकळ आहे. ते खदखदत हसू असंख्य कोंदलेली आसवं लपवण्याच एक माध्यम आहे हे माझ्या लक्षात आलं. माझेही डोळे डबडबले आणि पावलं घराकडे वळली पाऊस थांबला होता पण माझ्या मनातला विचारांचा चिखल मात्र अजून तसाच होता.

वाटलं, लहान मुलाला आणि व्रुद्ध माणसाला एक समान मायेची, काळजीची आणि आधाराची गरज असते. एके काळी राब राब राबून आपल्या मुलांच्या तोंडात दोन घास घालणारयांना आता आपल्याला कुणीतरी भरवावं अस वाट्त असतं. त्यांची धडपड असते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. निसर्गाच्या चक्रातील वार्धक्य हा अंतिम टप्पा आहे हे ते समजून चुअकलेले असतात. आयुष्यभराच्या गोळाबेरजेनंतर किती कमावलं आणि काय गमावलं याचा आलेख ते मांडत असतात. आरशातील ते जीर्ण व्यक्तिमत्वसुद्धा एकेकाळच्या कर्तुत्ववान छबीची साक्ष देत नाही.

जीवनाच्या चढ-उतारांवर अनेक पावसाळे पाहिलेल्या त्या डोळ्यांना ग्रीष्मातला पाऊसही गारवा देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी ’नेमेचि येतो मग पावसाळा’. त्या सारयांच्या समस्या जरी वरवर वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यांच मूळ एकचं आणि ते म्हणजे वार्धक्य. आता या ग्रीष्मातल्या पावसात कुणाच्या तळहातावर किती थेंब पडणार हे त्या ढगानेच ठरवायचं.

उन्हा-पावसाला सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे

तुझी आसवे ओझरू लागता, खरया पावसाने कुठे जायचे?

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Follow थेट दिल से on WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 473 other subscribers

अलीकडील पोस्ट

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही…
  • तुझी नी माझी प्रीत सख्या…
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

Top Posts & Pages

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही...
  • तुझी नी माझी प्रीत सख्या...
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

आर्चिव्ह्ज

  • डिसेंबर 2016 (1)
  • नोव्हेंबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2015 (1)
  • मार्च 2012 (1)
  • फेब्रुवारी 2012 (1)
  • ऑक्टोबर 2011 (1)
  • फेब्रुवारी 2011 (1)
  • जानेवारी 2011 (1)
  • नोव्हेंबर 2010 (3)
  • जुलै 2010 (1)
  • जून 2010 (2)
  • मे 2010 (3)
  • एप्रिल 2010 (1)
  • मार्च 2010 (2)
  • फेब्रुवारी 2010 (1)

प्रवर्ग

  • आपले सण
  • उपहास
  • कवितेचा कुंचला
  • येता-जाता
  • लघुकथा
  • सामाजिक
  • Uncategorized

Blog Stats

  • 24,072 hits

“मराठी ब्लॉग विश्व”

Create a free website or blog at WordPress.com.

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • थेट दिल से
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • थेट दिल से
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
%d bloggers like this: