• मी कोण ?

थेट दिल से

~ मनापासून

थेट दिल से

Monthly Archives: जून 2010

बाबा चमत्कार…

21 सोमवार जून 2010

Posted by truptisalvi in सामाजिक

≈ 14 प्रतिक्रिया

वशीकरण, प्रेम मे या कामकाज मे असफ़लता, सौतन से छुटकारा, भूतबाधा, संतानप्राप्ती तथा अन्य किसीभी समस्या का १००% निश्चित उपाय.. बाबा पाशा बंगाली…..तंत्र मंन्त्र के सम्राट..मेरे किये हुये काम को कोइ काट दे तो उसे नगद इनाम, गेरेंटी कार्ड के साथ समस्या का समाधान इत्यादी इत्यादी….. हुश्श….. केवळ पोस्ट लिहायची म्हणून हे सगळ लक्षात ठेवल होत…

                                                                                                                    

                                                                                                                 छायाचित्र आंतर्जालावरून साभार 

परवा सहज केबलवर ही जाहीरात पाहिली… तशी बरेचदा पाहिली होती पण ही जाहीरात लागली कि मी लगेच चॅनेल बदालायचे पण परवा का कुणास ठाऊक पूर्ण पाहिली.. आणि हसाव कि रडावं ते कळत न्हवतं.. ट्रेनमधे तर या जाहिराती राजरोसपणे सगळ्या डब्यांमधे बेधडक झळकत असतात… तेव्हा आपल्यासारखी मंडळी डोळेभर ह्या जाहीरात वाचतात (किमान मी तरी) आणि मग त्याकडे एक उपेक्षित कटाक्ष टाकून विसरून जातात. पण इतकी वर्षे मी ह्या जाहिराती बघतेय, ऐकतेय म्हणजे या लोकांचा धंदा (हो धंदाच) बरयापैकी चालू असला पाहीजे असा अंदाज आला. आपण (सुशिक्षित) भलेही अगदी अशा बाबांकडे जात नसू पण जेव्हा परिस्थिती आपल्याला हरवते तेव्हा भडजींकडे पत्रिका दाखवणे, वेगवेगळी रत्न अभ्यास न करता वापरणे, यद्न्य हवन करणे, कालसर्प…वगैरे वगैरे(अजून काही असेल तर प्रतिक्रियेत द्या) करतोच की मग अशिक्षित लोकं जी परिस्थितीपुढे झुकतात ती अशा ढोंगी बाबांच्या भुलथापांना बळी पडतात. एखादा माणूस जो १००% खात्री देतो कुठ्ल्याही समस्येचे निवारण करण्याचे, तर त्याच्या विद्येत काहितरी तथ्य असेल असा विचार करून जाणारया माणसांचा वर्गही कमी नसावा.

कारण काहीही असो पण जेव्हा केबल टि.व्ही वर अशा जाहीराती येतात तेव्हा रागही येतो आणि आश्चर्यही वाटतं. कबूल आहे की केबल टी.व्ही हे एक प्रायव्हेट प्रसारमाध्यम आहे पण तरीही सामाजिक स्वास्थ्याप्रती त्यांचीही काहीतरी जबाबदारी आहे की नाही. केवळ जाहीरातीचे पैसे मिळतात म्हणून कुठल्याही ऐरयागैरयाला असे मुक्तपणे अंधश्रद्धेचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ नये असे मला वाटते.

हल्ली तर न्यूज चॅनेलसुद्धा अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी फूटेज बिनदिक्कत रोमांचित निवेदनाने सादर करतात.  केवळ स्पर्धेत टिकून राहवं, चॅनेलचं टि.आर.पी वाढावं आणि २४ तास काहितरी दाखवत राहाव लागत म्हणून अशा स्टोरीज कव्हर करण आणि लोकांची दिशाभूल करण..केवळ या तत्वावर पत्रकारीतेला धाब्यावर बसवून अशा स्टोरीज अगदी रोजच्या रोज टेलिकास्ट केल्या जातात.

अजून एक गोष्ट अशी जाहिरात करणारे सगळे बाबा करतात ती म्हणजे आपली जाहीरात ते साई बाबांच्या फोटोने करतात. श्री साई सतचरित्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे किंवा साई बाबांवर केलेल्या अनेक चित्रपट तथा मालिकांमधून दाखविल्याप्रमाणे साई बाबांनी आपल्या सामर्थ्याने अनेक चमत्कार घडवले. ह्या (ढोंगी बाबा) लोकांनी नेमकी ह्याच गोष्टीची ढाल बनवून स्वताच्या धंद्याचा प्रचार केलाय. ह्याही काळात जर साई बाबा चमत्कार दाखवू शकतात तर आम्ही का नाही…मग आम्ही साईंचेच अंश वगैरे असा ही आभास गि-हाईकांपुढे निर्माण केला जात असावा. पण किमान लोकांनी तरी डोळसपणा दाखवावा…साई बाबांनी चमत्कार दाखवले असतील तर ते लोककल्याणास्तव… त्याचे कधी पैसे नाही घेतले त्यांनी…

मला एक प्रश्न पडला आहे की सरकार किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले या अशा पब्लिकली केल्या गेलेल्या जाहिरांतींविरूद्ध काही कार्यवाही का नाही करत?

अशा बाबांचे अंगारे फुकून जर नोकरी मिळायला लागली तर शिक्षण घ्याच कशाला??? घर बसल्याच नोकरी आणि छोकरी मिळेल की…. 😉

तुमच्या परिचयात अशा कुणा बाबाचा अनुग्रह (हा शब्द उपहासाने वापरतानाही मला हसू आवरत नाहीये…) कुणी घेतला असेल तर अनुभव जरूर शेयर करा.

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

न्यायाचे पारडे रिकामेच…

09 बुधवार जून 2010

Posted by truptisalvi in सामाजिक

≈ 8 प्रतिक्रिया

2-3 डिसेंबर १९८४…युनियन कार्बाईड…भोपाळ वायुगळती…सुमारे १५ हजारांचा बळी…५ लाख लोकांना अपंगत्व… हे असे तुटक शब्द ऐकले तरी अंगावर काटा उभा राहतो. जगातली सगळ्यात मोठी औद्योगिक हानी समजली जाणारी ही दुर्घटना…२५ वर्षे न्यायासाठी अविरत लढा दिल्यानंतर तो निर्णायक दिवस उजाडला जेव्हा अनेक पिडितांचे(केवळ त्या दुर्घटनेत बळी पडलेलेच न्हवे तर ज्यांच्या संवेदना जाग्रुत आहेत अशा कित्येक भारतीयांचे) कान न्यायालयाच्या सुनावणीकडे लागले होते. पण पदरी पडली ती घोर निराशा आणी अंतकरणातून येणारी प्रचंड चीड. असला कसला न्याय आहे हा?? ज्या अधिकारयांच्या गैरजबाबदारपणामुळे भोपाळमधील पिढ्याच्या पिढ्या उध्वस्त झाल्या. अतोनात प्राणहानी झाली, कित्येक लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले…तरीही भारतीय न्यायव्यवस्थेने या क्रुत्याला जबाबदार असणारया ८ भारतीय अधिकारयांना केवळ दोन वर्षांची शिक्षा (त्यातील एक तर निकाल लागण्याआधीच आपले आयुष्य समाधानाने जगून जगाचा निरोप घेऊनही गेला) सुनावली….ती ही २५ वर्षांनंतर…. बर त्यातही जामीनावर सुटका करून घेण्याची पळवाट….मग काय…लागलीच दोषींनी जामीनावर सुटका करून घेतली……बरं तो वोरन ऐन्डरसन…युनियन कार्बाईडचा मुख्य कार्यकारी अधिकारी…तो तर या दुर्घटनेनंतर जो न्युयोर्क ला फरार झाला त्याचा अजून काही थांग पत्ता नाही….अमेरीकन सरकारने तर २००३ मधेच यासंदर्भात आपले हात वर केले. पण त्यांना दोष देऊन काय उपयोग??? इथे आपलाच रूपया खोटा तिथे डोलरचा भाव कशाला काढा…. या केसचा इतिहास तपासला तर कळेल की आपल्या लोकांनी पण कशी माती खाल्लीय ते….

१९८४ साली केंद्रात कोंग्रेस सरकार होते…कोंग्रेसचेच अर्जुन सिंग त्यावेळेस मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. या घटनेच्या वेळेस ऐन्डरसन भारतात घटनेच्या पाहणीसाठी आला होता आणि चारच दिवसात त्याला जामिन मंजूर झाला आणि हद्द म्हणजे मुख्यमंत्र्यांचे विमान त्या ऐन्डरसनला भोपाळ सोडण्यासाठी दिले गेले. त्यानंतर जो अधिकारी सी.बी.आय. चौकशीचा प्रमुख होता त्याला मिनिस्टर्स ओफ एक्स्ट्रनल अफेयर्स यांनी ऐन्डरसनला भारतात खटल्यासाठी बोलावले जाऊ नये असे आदेश दिले. आज मात्र आपल्या दोन्हीही फ़्रंट एन्ड पार्टी त्यावेळेस त्यांनी न्याय मिळवण्यासाठी कसे प्रयत्न केले याचे दाखले देतायत…. राजकारणात लाज कोळून प्यायलेली ही माणसं न्यायाच्या गोष्टी करताना पाहिली की मस्तकात तिडिक जाते.

मला कायद्यातील फार काही कळत नाही पण तरीही एक सुजाण नागरीक म्हणून कायम एक प्रश्न जरूर पडतो की आपली न्यायव्यवस्था इतकी पांगळी का??? एखादा खटला निकालात काढायला २५-२६ वर्षे….आणि इतक्या वेळानंतरही पदरात पडलेला कवडीमोलाचा न्याय…..आपल्याच देशात आपल्याच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्यालाच संघर्ष का करावा लागतो? या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या जखमांवर जणू मीठच चोळले गेले….त्यांच्या अश्रुंचे आणि पिडीचे हे मोल केले न्यायाच्या रक्षकांनी??? खरच न्यायाचे पारडे न्यायाने खाली नाही झुकले तर ते रिकामेच राहीले.

हे शेअर करा:

  • Email

Like this:

Like Loading...

Follow थेट दिल से on WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 473 other subscribers

अलीकडील पोस्ट

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही…
  • तुझी नी माझी प्रीत सख्या…
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

Top Posts & Pages

  • मिड्ल क्लास
  • वेळ नाही मला
  • बाबा हवा होतास तू
  • ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष
  • भय इथले संपत नाही...
  • तुझी नी माझी प्रीत सख्या...
  • सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग
  • अनाम प्रेम
  • बाळकडू
  • धूर-धडाका

आर्चिव्ह्ज

  • डिसेंबर 2016 (1)
  • नोव्हेंबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2016 (1)
  • ऑक्टोबर 2015 (1)
  • मार्च 2012 (1)
  • फेब्रुवारी 2012 (1)
  • ऑक्टोबर 2011 (1)
  • फेब्रुवारी 2011 (1)
  • जानेवारी 2011 (1)
  • नोव्हेंबर 2010 (3)
  • जुलै 2010 (1)
  • जून 2010 (2)
  • मे 2010 (3)
  • एप्रिल 2010 (1)
  • मार्च 2010 (2)
  • फेब्रुवारी 2010 (1)

प्रवर्ग

  • आपले सण
  • उपहास
  • कवितेचा कुंचला
  • येता-जाता
  • लघुकथा
  • सामाजिक
  • Uncategorized

Blog Stats

  • 24,042 hits

“मराठी ब्लॉग विश्व”

Blog at WordPress.com.

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • थेट दिल से
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • थेट दिल से
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
%d bloggers like this: