इमेज

मिड्ल क्लास

middle_class_sign

 

मी तरी काय करू

मिड्ल क्लास म्हटल की उपाधीच वाटते

संस्कारांच्या तिजोरीची किल्लीच भासते

मांडी मारून जेवण्यातच गंमत वाटते

काट्या-चमच्याने न्हवे, बोटांनीच भूक भागते.

मी तरी काय करू

“ब्रॅण्डेड” म्हटल की महागच वाटते

बजेटेड शॉपिंग नेहमीच पटते

घासाघीस केल्याशिवाय खरेदी होत नाही

विकत पिशवी घेण हे बुवा जमत नाही.

मी तरी काय करू

छत्रीच्या तारा अजूनही जोडून आणतो

तुटलेली चप्पल अजूनही शिवून घालतो

जुन्या गोष्टी सोडवत नाही

त्यांच्याशी नाळ काही तोडवत नाही.

मी तरी काय करू

पैसा आला तरी क्लास येत नाही

अकारण पैशाचा माज येत नाही

बस- रेल्वेचा प्रवास अजूनही रुचतो

रोडसाईड वडा-पाव अजूनही पचतो.

मी तरी काय करू

आज-काल गाडीने मी ही फिरतो

पहिल्यापेक्षा सुखवस्तू मी ही राहतो

जगण्याच्या शर्यतीत मी सुद्धा पळतो

पण थकल्यावर जुन्या आठवणीतच शिरतो.

मी तरी काय करू

पैशाने माणसाला तोलत नाही

क्लास पाहून त्यांना जोडत नाही

तरीही माझी वर्गवारी होते

कपड्यांवरून माणसाची किंमत का कळते.

वेळ नाही मला

टॅगस्

, ,

घड्याळाचा गजर म्हणतो पहाट झाली उठा

जांभई देऊन शरीर म्हणत अजून झोप जरा

जिमची बॅग , योगाची मॅट सगळ वाट पाही

अंगातला आळस मात्र काही जाऊ पाहत नाही

रनिंगचे शूज खूणावून म्हणतात धाऊन बघ जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

उठल्या उठल्या ब्रश आधी मोबाइल पडे हाती

मेसेज, मेल्स, व्हाट्सअप यांच्या खचात बुडलो आम्ही

पलन्गावरची चादर म्हणे घडी घाल माझी

मान फिरवून मी तरीही स्क्रीन स्क्रोल करी

खिडकी आडून सूर्य म्हणे खाली उतर जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

अचानक घड्याळ पाहीले की बोबडी आमची वळते

मोबाईल च्या नादात वेळेच गणित अगदी कसे चुकते

घाई घाईत रोजच निघताना काहीतरी हुकते

नऊ पाच ची लोकल आमची सातत्त्याने मुकते

किचनमधला स्वयंपाक म्हणतो खाऊन घे जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

ऑफीस मधे कामाचा खूप भार होतो

त्याचा शीण जावा म्हणून सुट्टा ब्रेक घेतो

नाकातून धूर सोडत देशाच्या व्यथा गातो आम्ही

डोक्यात राग, वाणीत आग अन् सिगरेट पायाखाली

जिन्याच्या पाया-या म्हणी आम्हाला चढून बघ जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

कॉफी , स्मोक , पिझ्झा शिवाय पान हलत नाही

पोळी भाजीचा डबा माझी वाट पाहत राही

अपचन , जळजळ यांची आता सवयच झालीय मला

शूगर, कोलेस्ट्रोल वाढले कसे कारण काही कळेना

पॅंट्री मधली ग्रीन टी म्हणे पिऊन बघ जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

थकून घरी आलो की TV च्या समोर बसतो

स्ट्रेस जावा म्हणून पुन्हा स्ट्रेस्सफूल गोष्टीच बघतो

यंत्रयुगाने पछाडल आणि शरीर झाले स्थूल

व्याधी काही जडल्या तर त्यांच सापडेना मूळ

रात्रीच जेवण म्हणत अरे वेळेत खा मला

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

 

आप्तेष्टान्शी संवाद आता कधी कधीच घडतो

फेसबूकच्या पोस्ट वरून त्यांचा स्टेटस मात्र कळतो

मैदानी खेळ, मित्रांचा कट्टा हे सारे विस्मरणात गेले

मूवीस, रेस्टोरेंट्स, पब्ज यांनी खिशात भोक केले

मित्रांचा जुना फोटो म्हणतो भेटून ये जरा

मी मात्र नेहमीच म्हणतो वेळ नाही मला

बाबा हवा होतास तू

टॅगस्

, ,

सायकलीच्या सीटला धरून धावलास तू

माझ्या वेगाशी वेग धरून लहान झालास तू

तूझच बोट धरल जेव्हा धडपडत पाऊले टाकली

तूझ्याच पोटावर विसावले जेव्हा तीच पाऊले थकली

भातूकलीचा खेळ खेळायला यायला हवास तू

तुझ्या बाहूलीचा संसार पाहायला हवा होतास तू

 

मराठीच्या कविता वारंवार गायचास तू

“गाई पाण्यावर आल्या” गात कुशीत घ्यायचास तू

तुझा कंठ तेव्हाही दाटायचा तो सूर धरताना

त्या वेळी मनात वेगळ घर करायचास तू

तो सूर धरायला , मला कुशीत घ्यायला पुन्हा येना तू

आयुष्याचे गीत गायला अजून हवा होतास तू

 

जेव्हा कधी रागवलास, मनातच भान्डले तुझ्याशी

आजीवन बोलणार नाही असा चंगच बांधला मनाशी

असे कित्येक पण मोडीत काढलेस तुझ्या हळवार स्पर्शाने

तुझ मन मेणाच लगेच पाघळायच माझ्या रागाने

लटका फूगवा राग माझा काढायला हवास तू

हट्ट माझे पूरवायला बाबा हवा आहेस तू

 

हात ओल्या मेहन्दीचे, तर घास भरवलास तू

पाठवणीच्या क्षणाला मनसोक्त रडलास तू

माझ्या मुलीला सांभाळा अस थरथरत बोललास तू

नजरेआड मी होईपर्यंत उभाच ठाकलास तू

काहीतरी सुटल…काहीतरी वीरल , मन माझे मागे धावी

आशीर्वादाचा हात ठेवायला बाबा हवा आहेस तू

 

तूझ्या आठवणी तुझ्याचसारख्या, मला लावी माया

ओठावर हसू, डोळ्यात अश्रू अशी त्यांची किमया

उन पावसाचा खेळ त्यांचा माझ्या मनी चालतो

मग “तू आहेस की नाही” असा वेडा प्रश्न पडतो

शरीराने नसलास तरी सतत जाणवतोस तू

तुझ्या आठवणीतूनच निरंतर जगत राहतोस तू

ओक्टॉबर मुंबई 2015 विशेष

जीवाची तगमग, घशाला कोरड
अंगाची होतेय लाही लाही
वाट पाहून शिणलोय आता,
शिशिरा कृपा केव्हारे होई?

आद्रही आहे आणि उष्णही,
कोरड ही आहे आणि घामही
वर्षा गेली शरदही सरला
तरी ग्रीष्माची मिठी काही सुटत नाही

काम नाही हे पन्ख्याचे
नाही गार पाण्याचे
सार्यांनीच हात टेकले यापुढे
जरी युग असले हे यंत्रांचे

वरुन सूर्य ओततोय आग
खाली आहे प्रदुषण
मुंबई आता त्रस्त झालीय
देईल तरी कुणाला दुषण?

वाट पाहतोय शिशीरागमनाची
झालोय आम्ही आता चातक
बन्डीची थंडी नको रे बाबा
मुंबईची अपेक्षा अगदीच माफक

दिवाळी आता तोन्डावर आलीय
सणाचा उत्साह वाढू दे जरा
गुलाबी थंडीने घेऊदे कुशीत
रोशणाईने उजळूदे आसमन्त सारा…

भय इथले संपत नाही…

टॅगस्

, , ,

भूताखेताबद्दलचे न्हवे तर न संपणा-या परिक्षांचे. शाळेत असताना वाटायच या सारख्या येणा-या घटक चाचण्या मग सहामाही मग पुन्हा चाचणी आणि मग अजस्त्र अशी भासणारी वार्षिक परीक्षा पाठलागच सोडत नाहीत. एक संपतेय आणि निकालपत्र हाती पडतय ना पडतय तोवर दुसरीचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर चिकटलेलं. खरतर लेखी पेक्षा तोंडी परिक्षेच्या वेळेसच तोंडच पाणी पळायचं. पेपरात काय लिहितोय हे आपल्यापुरतच फार फार तर तपासणा-या शिक्षकांपुरतच मर्यादीत असायचं, पण तोंडी परीक्षेला संपूर्ण वर्गासमोर आरोपीच्या पिंज-यात उभ केल्यासारख वाटायच. आपला टर्न येउन गेला की मगच दुस-याला तोंडघशी पडताना पाहून मजा वाटायची.

दहावी संपली आणि वाटल आता आपण थोडे मोठे झालो आहोत. कॉलेजला जाणार. तेव्हा तिथल्या आयुष्यासारखच (हिंदी मुव्हीज मधे दाखावतात तस) परीक्षांच वेळापत्रकही “रीलॅक्स्ड” असेल…पण कसल काय…बारावी आणि मग कुठल्यातरी चांगल्या प्रोफेशनल कोर्से साठी (मेडीकल आणि अभियांत्रिकी य दोनच विक्ख्यात प्रक्ख्यात आणि थोरामोठ्यांना माहीत असणा-या शाखा) वाहत्या पाण्यात सूर मारण्याची तयारी सुरू करावी लागली. तेही पार पडल एकदाच.

जस पाषाणयुग, लोहयुग, कलियुग तस काही वर्षांपूर्वी आलेल्या “अभियांत्रिकी” युगातल्या इतर प्राणीमात्रांप्रमाणेच मी सुद्धा एंजिनियरींगला ॲडमिशन घेतल. इथे तर वेगळच विश्व. परिक्षांच स्वरूप सेमिस्टर पॅटर्न मधे बदलल आणि भितीचही.(आणि मजेचही 😉 ) परीक्षेच्या दिवशी “अरे कुछ नही पढा है यार” हे वाक्य दहा पैकी नऊ जणांच्या तोंडी तरी हमखास असायच. आणि निकाल पहायच्या वेळेला “मुखी गोड नाम असावे श्रींचे आणि पोटी उमटावे कड भितीचे” असली कसली गत व्हायची.

“ओरल”…इंजिनियरींगचे विद्यार्थी यावर पानोंपानांचा निबंध लिहू शकतील एवढी या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. “एक्सटर्नल” नामक एरव्ही अतिसामान्य वाटेल असा माणूस ओरलला गव्हर्नर च्या तो-यात खुर्चित बसून आमच्या ज्ञानाची अक्षरश: चिरफाड करायचा. यादिवशी मात्र कॉलेजात हिरोगिरी करणारी पोरंसुद्धा शर्ट इन करून, केसाचा भांग पाडून अगदी सज्जन बनून यायची. जो जास्त बोलण्याच्या फंदात पडला तो गेलाच बाराच्या भावात. जी कोणी मुलं ओरल देऊन बाहेर यायची, बाकीच्या मुलांचा घोळका त्यांच्या भोवती जमायचा. ” ए क्या पुछा? बता ना…” मग त्याने सांगितलेल्या प्रश्नोंत्तरांची शोधाशोध सुरू व्हायची. एखादा त्यातलाच कथाकार निघाला तर आत घडलेल्या आणि न घडलेल्या अशा दोन्हीही कथा अगदी रंगवून रंगवून सांगायचा.

नग समजल्या जाणा-या आणि प्रोफेसरांच्या डोळ्यात खुपणा-या मुलांचा चांगलाच उद्धार ओरलमधे व्हायचा. (आता प्रोफेसर लोकांना विचित्र विचित्र पाळीव नाव (पेट नेम्स) ठेवून त्यांना कॉलेजभर प्रसिद्ध केल्यावर काय यांच कोड-कौतुक होणार आहे?) पण गप्प बसतील तर ती अवली मुलं कुठली? कॉलेजच्या ॲन्युअल गॅदरींगला स्वत:च अनामिक नावाने असे काही फ़िशपोंड लिहायची की प्रोफेसर ओशाळून लाल-लाल झालेच पाहिजेत. तेव्हा एरव्ही गुणापत्रिका पाहून यांच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घ्यावी की यांच्या कवी मनाने घेतलेल्या भरारीच कौतुक कराव हा प्रश्न पडायचा.

असो विषयांतर होतय. तर अशीही परीक्षेची भिती डिग्री नंतर संपवून टाकायची अस ठरवल आणि नोकरी धरली. इथेही ट्रेनी म्हणून दाखला मिळाला आणि चांगल प्रोजेक्ट मिळाव म्हणून परीक्षा सत्र सुरूच. 🙂

शाळा कॉलेज संपल तरी आजही मला परीक्षेची स्वप्न पडतात ज्यात शेवटच्या क्षणापर्यंत माझा काहिही अभ्यास झालेला नसतो आणि मी फक्त पुस्तकांची पान पलटत असते. मला खात्री आहे तुमच्यापैकी ब-याच जणांना थोड्या फार फरकाने ही अशी स्वप्न पडतच असणार.

व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्हीही पातळींवर आपण नेहमीच अशा परीक्षांना तोंड देत असतो. फक्त त्यांच आणि त्यांच्या ब्रोबर येणा-या भितीच स्वरूप वेगवेगळ असत. घटक चाचणीपासून ते अगदी वधू-वर परीक्षेपर्यंत आपल्या गुणांचा (आणि अवगुणांचाही 🙂 ) कस लागत असतो. कधी डिस्टिंक्शन , कधी फर्स्ट क्लास मिळवून तर कधी अपयशाची पहिली, दुसरी, तिसरी…जोपर्यंत यश मिळत नाही तोवर पाय-या चढत चढत वर जात रहायचं.

 

तुझी नी माझी प्रीत सख्या…

टॅगस्

, , ,

गाठ माझ्या पदराची तुझ्या उपरण्याला पडली
सप्तपदी चालताना तुझ्यासवे नजर माझी झुकली
लग्नमंडपी शोभा होती परी मनी माझ्या भीती
अनोळखी या नात्याला कशी मी समजू प्रीती

गाली होता विडा परी नयनी माझ्या अश्रू
अंतरपाट मधे स्थिर आणिक समोर उभा तू
हाती पुष्पमाला अन कानी घुमती अष्टके
जन्माचा जोडीदार कसा तू हे पडले मोठे कोडे

पाठवणीची घडी ती मज कठीण बडी जाहली.
माया आई-बाबांची डोळ्यातून वाहली
श्वास माझा अस्थिर होता अन ऊर भरूनी आला
मज न्याहाळूनी हात तू माझ्या हातावरी ठेवला

तुला जपेन असेच निरंतर हे स्पर्शातूनी बोललास
पाणावल्या डोळ्यात तू माझ्या प्रथम सामावलास
नाव तुझे घेऊन सासरचा उंबरठा ओलांडला
घर अपुले फुलवेन सुखाने हा मनी चंग बांधला

कधी रागाने कधी लोभाने नाते जडतच गेले
सहवासाने मनात माझ्या घरटे जणू बांधले
स्पर्श तुझा होताच सा-या विवंचना त्या मिटती
जोडीदार जन्माचा तूच ही पटते मज शाश्वती

दीन हे सरता नकळत कसे अद्भुत नाते जडले
तू नसताना रीतेपणाने मी स्वत:स हरवून बसले
प्रेम माया मित्र सखा मज सारे तुझ्यात दिसले
जीव गुंततो कुणात हे तुलाच पाहूनी कळले

तुझी नी माझी प्रीत सख्या अशीच फुलत राहो
हर एक दिनी नवीन रूपाने नाते हे उलगडो
उन-पावसाचे सारे ऋतू मी तुझ्यासवे पाहीन
सप्तपदीच्या सा-या शपथा नेमाने पाळीन

सी वर्ल्ड आणि रिवर ट्यूबिंग

लेबर डे वीकएण्डचा काहिच प्लॅन ठरला न्हवता. पण डॅलस मधले बहुतेक सगळेच मित्र मैत्रिणी कुठे ना कुठे तरी बाहेर जातच होते. आम्ही मात्र मूवीज़, हॉटेलिंग आणि लोंग ड्राईव्ह एवढाच प्लॅन केला होता. आणि अचानक शुक्रवारी दुपारी अहोन्चा फ़ोन येतो विचारायला की आपण सॅन आंटोनीयोला जायच का?
सॅन आंटोनीयो म्हणजे अरविंग पासून किमान ४ ते ५ तासाची ड्राईव्ह (रस्त्यावरिल वेग मर्यादांच पालन केल तर 🙂 ) मी लगेच सम्मति दर्शविली. आमचे अज़ून २ मित्र यायला तयार झाले. अहोन्नी लगेच मेरीयट मधे २ रूम्स बुक केल्या आणि सी वर्ल्ड ची चार टिकेट्स सुद्धा. शुक्रवारी सन्ध्याकाळी ६.३0 ला सगळे आमच्याच घरी जेवायला आले. मग मीही पुलाव, कढी, सलाद आणि पापड असा झटपट मेनू तयार केला आणि पॅकिंग केल.

साधारण ७.४५ ला आम्ही प्रवास सुरू केला. गाणी, गप्पा, खादाडी करत आम्ही रात्री १.३0 च्या सुमारास होटेल वर पोहचलो. सगळी ओपन पार्किंग्स गाड्यान्नी भरलेली होती. शेवटी होटेल समोरच्या मिटर पार्किंग मधे गाड़ी लाऊन आम्ही रूम वर गेलो. दुस-या दिवशी सकाळी ८ पर्यंतच आम्ही मीटर पार्किंग करायच ठरवल होत. पण रात्री आधीच उशीर झाल्याने सकाळी सगळे ब्रेकफास्ट्लाच ८ ला उतरले 🙂 मग अज़ून १ तासाच पार्किंग घेऊन आम्ही ९ ला सी वर्ल्ड ला जायला निघालो.
मी फारच उत्साहीत होते कारण राइड्स मधे बसायला मला खूप आवडत. अगदी जत्रेतल्या आकाश पाळण्यात सुद्धा. पण सी वर्ल्ड म्हणजे फफ्त राइड्स नाहीत. खरतर राइड्स हाताच्या बोटान्वर मोजता येतिल एवढ्याच आहेत पण त्या जर त्यान्च्या आकारमानाच्या चढत्या क्रमाने केल्या तर हृदयाचे ठोके पण तेवढ्याच चढत्या क्रमाने वाढलेले जाणवतात. 🙂
सर्वप्रथम आम्ही एक ४-डी शो पाहायला गेलो त्याच नाव होत “Sesame Street Presents Lights, Camera, Imagination in 4-D”. हा लहान मुलान्साठीचा शो होता. त्यात ४-डी चे इफेक्ट्स चांगले होते पण त्याचे कथानक आणि कार्टून पात्र अगदिच माफ़ होती. आम्हा चौघान्नाही तो शो काही विशेष आवडला नाही. असो, पण यापुढची सी वर्ल्ड मधली आमची सफ़र फारच रोमांचक होती.

Penguin Encounter,Rocky Point Preserve,Flamingo Cove,Alligator Alley,Boardwalk Games,Cannery Row Caper,Seafari Tour,
Dolphin Cove ईत्यादी ईत्यादी अशी एक ना अनेक आकर्षणे अगदी मजेशीर होती. राइड्स मात्र आम्ही शिल्लक ठेवल्या होत्या कारण त्यावर आधी बसायाच की सन्ध्याकाळी यावर एकमत होत नव्हत.

इतकी सगळी सफ़र केल्यावर आणि उन्हातून नकाशा घेऊन भटकल्यावर सपाटून भूक लागली होती. सकाळचा कोन्टिनेन्टल ब्रेकफ़ास्ट कुठल्या कुठे गुडूप झाला होता. मग कुठे खायच हे सुद्धा नकाशा बघूनच ठरवल आणि रोसिटा केफे मधे गेलो. i must say one of my best eating experiences. बफ़े लंच होता… 12 डॉलर मधे अनलिमिटेड पिझ्झा, पास्ता, सलाद आणि सोफ्ट ड्रिंक्स. पिझ्झाचेच किमान ७-८ प्रकार, आवडीप्रमाणे पास्ताचे प्रकार आणि ड्रेसिंग्स आणि सलाद. पास्ताची चव अजूनही जिभेवर रेन्गाळतेय. सगळ्यान्नीच आडवा हात मारला म्हणूनच कुणाला त्या डिशेसचे फोटो घ्यायला सुचले नाही 🙂 पण फक्त एक आठवण म्हणून मन आणि पोट तृप्त झाल्यावर बाहेरूनच केफे चा तेवढा फोटो आम्ही न चुकता काढला.

This slideshow requires JavaScript.

आता अगदी आकन्ठ जेवण झाल्यावर राइड्स मधे तर आम्ही बसूच शकत न्हवतो. म्हणून तिकड़चे एक ख़ास आकर्षण “The Shamu Show” बसून पाहायच आम्ही ठरवल. पण लोकेशन ला पोहचेपर्यन्त स्टेडीयम खचाखच भरल होत. ट्रेन मधे मिळते तशी चौथी सीट पण नाही मिळाली 😦 त्यामुळे माना उन्च करून शो पाहिला पण त्याची मज़ा नाही लुटता आली. म्हणून सन्ध्याकाळी ६ चा रिपिट शो न चुकता अगदी पुढच्या रान्गेत बसून बघायचा ठरवल. मग थोड़े बोर्ड वॉक गेम्स खेळलो. त्यात कुणालाही काहीही जिंकता आल नाही.
आता ती वेळ आली होती जेव्हा मला राइड्स वर बसण्याची अती उत्कट इच्छा होत होती. आणि धीर गोळा करण्यासाठी आम्ही धोक्याच्या पातळीच्या चढत्या क्रमाने एक एक करून राइड्स वर गेलो. Rio Loco,Journey to Atlantis,Quick Queue,great white आणि सगळ्यात जास्त ठोके वाढले ते “Steel Eel” मधे.
त्यातून बाहेर आल्यावर आणि वर मान करून त्या विशाल स्ट्रक्चर कड़े बघून पुटपुटलो This is utter non sense we have done in our life. मग त्याचे स्ट्रक्चरल ईंजीनियरींग, सेफ्टी मेजर्स, हझार्ड लिमिट्स ईत्यादी ईत्यादी वर चर्चा सत्र सुरू झाले. चार ईंजीनियरींग डोकी एकत्र आल्यावर दूसर काय होणार.
सन्ध्याकाळचे चे ५.३0 वाजले होते आणि आता आम्हाला पुढे बसून शामू शो पाहायचा होता. मी आणि अहोन्नी धावत जाऊन सीट अडवायच ठरवल आणि दूसरे दोघे आइसक्रीम आणि पाण्याच्या बाटल्या आणायला गेले. ६ वाजता शो सुरू झाला आणि आम्ही त्यात रंगून गेलो.

जाता जाता एक शेवटच आकर्षण म्हणून फायर क्रॅकर शो बघायचा की परत जाऊन “River Walk” म्हणून अज़ून एक आकर्षण कवर क़रायच यावर चर्चा झाल्यावर River Walk लाच जायच ठरल. कुठल्याही कनाल साईड सफ़री सारखाच हा रिवर वॉक होता अगदी यूरोप मधे युथ्रेट किंवा आम्सटरडॅम सारख्या ठिकाणी पाहायला मिळाला तसाच पण हा रिवर वॉक तुलनेने अगदिच हलका वाटला. कदाचित् रात्र होवून आता परत इंधन भरायाची वेळ झाली होती म्हणून की काय कनालला पूर्ण वळसा घालायच्या फंदात आम्ही पडलो नाही आणि इतरत्र दिसत असणा-या नेमकया कुठल्या कुजीन मधे धाड़ टाकायची यावर वाद सुरू झाले.
शेवटी “Chilli’s” मधे गेलो. आधीच वेटिंग होत त्यात टेबल मिळाल्यावर साधारण ४५ मिनिटान्नी ओर्डर आली.
आता पुढे काय?? होटेलच बुकिंग एक रात्र आणि एक दिवस अस केल होत पण आता दिवसभराच्या थकव्यामुळे आहोन्नी पुन्हा ५ तास ड्राईव करायला स्पष्ट नकार दिला. आणि जर एक रात्र वाढणार असेल तर दुसर्या दिवशी सकाळी वाटेतच ऑस्टिनला जायाचा प्लॅन ठरला.
Austin is the city of universities पण उन्हातून साईट सिनिंग करायाची कुणाचीच ईच्छा न्हवती म्हणून आम्ही रिवर ट्युबिंग ला जायच ठरवल. सकाळी उठून आम्ही ऑस्टिन रिवर ट्युबिंग ला गेलो. ट्युबिंग चा मार्ग आणि तंत्र तेथिल ट्यूब विक्रेत्याकडून समजावून घेऊन ५ ट्यूब्ससकट आम्ही नदिकडे निघालो. पाचवी ट्यूब खादाडी आणि पाण्याच्या बाटल्यांच कूलर ठेवायला घेतली होती.
सुरुवातीला आमच्यापैकी कुणालाच ट्यूब ला फ्लोट करता येत न्हवत. जवळ जवळ अर्धा तास तर आम्ही दूसरयांकड़े बघत ट्यूबला वल्हवायच कस हे शिकत होतो. आमची नाव मात्र उलट्याच दिशेने जात होती 🙂 हळू हळू जमायला लागल आणि मग yeah its not a rocket science असे उद्गार बाहेर आले.

आहोंनी नको नको म्हणत असताना आठवणी साठवण्याच्या नावाखाली मी कॅमरा ट्यूब मधे आणला होता. आणि नेमका एंड पॉइंट ला उतरताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे मी कमरेपेक्षा अधिक उन्चीच्या पाण्यात लॅंडिंग केल. कमरेला अडकवलेला कॅमरा कवरसकट पाण्याखाली….
बाहेर आल्यावर माझी काही खैर नाही हे मला कळून चुकले होते. घाबरत घाबरत मी कॅमरा ऑन करण्याचा प्रयत्न केला आणि व्हायच तेच झाल होत. 😦 मग पटकन मेमरी कार्ड आणि बॅटरी काढून कॅमरा वेगळा ठेवला. मला संपूर्ण सहलीलाच गालबोट लागल्यासारखे झाले.
मी नाराज़ होते पण सगळे म्हणत होते की कॅमरा सुकला की ठीक होइल. अहोन्नी हळूच “बघ नवा-याच ऐकल नाही की अस होत” असा टोला मारला.

रिवर ट्युबिंगचे तन्त्र कळले की मगच त्याचा आस्वाद घेता येतो. नेविगेशन, सेलिंग, प्रवाहाबरोबर फ्लोट होणे यात खूप व्यायाम झाला. दंड दुखायला लागले. आता कुठेही न थान्बता थेट अरविंग गाठायच ठरल. गणपतिचे दिवस होते आणि एका स्नेहींकड़े दिड दिवसाचे गणपति होते. त्यान्नी फ़ोन करुन परस्पर घरी गणपतीला आणि रात्रीच्या जेवणाला आमन्त्रण केले. आम्ही साधारण ४.३0 तासाने ८.३0 च्या दरम्यान त्यान्च्याकडे पोहचलो. आरती केली आणि साबुदाणे वडे, ढोकळा, चटणी, पुलाव आणि मोदक असा उत्तम आहार केला. थेट घरी जाऊन सगळेच घोड़े विकुन झोपले (घोड़े बेचके सो गये). 🙂

ता.क. कॅमरा ३ दिवसांनी पूर्ण सुकल्यावर पूर्ववत झाला. आणि ख-या अर्थाने ही सहल महागात पडली नाही 🙂

अनाम प्रेम

नाही या पोस्ट मधे कुठलीही प्रेम कथा लिहिलेली नाही.

परवा ऑटो मधून घरी येत असताना या नावाने आणि त्या खालच्या मजकुराने माझी नजर रिक्षा ड्राइवर च्या सीट च्या मागे लावलेल्या पोस्टरने  खिळवून ठेवली. मला हसू आवरले नाही. पण मी एकटीच रिक्षात असल्याने ड्राइवर वेडी समजून मला खाली उतरवेल या भीतीने मी मनातल्या मनातच खदखदून हसले (हे मी समस्त रिक्षावाल्यांची माफी मागून लिहितेपण हसू आवरल नाही मला)

त्या पोस्टरचा लगेच फोटो काढावासा वाटला. पण रात्र असल्याने आणि माझ्या मोबाइल च्या कॅमे-याला फ्लॅश नसल्याने फोटो निटसा आला नाही. तरीही अपलोड करते.

 
 खर तर नवीन वर्षाचा संकल्प केला होता शक्यतो रिक्षाने प्रवास करणार नाही पण माझा हा संकल्प दोन दिवासांपेक्षा जास्त नाही टिकला. 🙂 मुंबईत राहून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने रिक्षाने प्रवास करण टाळणे म्हणजे थोडे कठीणच…

आपल्याला कुठेतरी जायला उशीर झालाय आणि अशा वेळिस तातडीने रिक्षा मिळणे आवश्यक असते तेव्हाचएकतर रिक्षा मिळत नाही(यालाही बरीच कारण असू शकतात ती पुढे सविस्तर मांडते) किंवा मिळालीच तर रिक्षावाला तुम्हाला तिकडे नेण्यासाठी नकार देतो (यालाही बरीच करणे असू शकतात 🙂 ) तेव्हा आपला ज्वरबिंदू किती उच्च होत असेल याची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकालाच असते रिक्षा (वाले) आणि पॅसेंजर्स याबाबतीत आढळणारे काही कॉँमन प्रसंग….

तुम्ही रिक्षाची वाट बघत उभे आहात. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक रिक्षा मधे डोकावून ती रिकामी आहे की नाही याची शहानिशा करताय. अशा वेळी

 1) एक रिक्षा थांबते. रिक्षावाला मानेनेच किधरअशी खूण करतो.
  
तुम्ही : अमुक अमुक जगह चालना है (आणि वाकून एक पाय रिक्षात टाकता)
 

रिक्षावला : उधर नही जाएगा (आणि लगेच अ‍ॅक्सेलरेटर वाढवतो)

तुम्ही : *#@#**$$

 2) एक रिक्षा तुम्हाला बघून तिचा वेग कमी करते. तुमच्या दिशेने येऊ लागते.

 तुम्ही(मनाशी) : हूश्श चला मिळाली नाहीतर उशिरच झाला असता. तुम्ही असे बोलून देवाचे आभार मानतच असता इतक्यात रिक्षावला तुमच्या थोडस पुढेच उभ्या असलेल्या सुंदर तरुणीच्या पुढयात रिक्षा थांबवतो. ती त्यात बसते आणि तुम्ही मात्र ती रिक्षा डोळ्याआड होईपर्यंत तिच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत राहता
  
तुम्ही : *#@#**$$

3) एक रिक्षा येते आणि तुमच्या पुढयात थांबते.  

रिक्षावला: (गुटखा चघळत तुमच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात)किधर जानेका?”

 तुम्ही : अमुक अमुक वेस्ट

रिक्षावला: (दोन मिनिट विचार करत आणि गुटखा रवंथ करत) “हम्म” (म्हणजे बैठो)

 अर्ध्या रस्त्यात

रिक्षावला: साहब गॅस खतम हो गया है उतरो

तुम्ही : अरे ऐसे कैसे खतम हो गया. अभी तो आधा रस्ता भी नही आए.

रिक्षावला: साहब ये कोई मोबाइल का टॉकटाईम है जो चेक करूगॅस है खतम हो रहा है.

तुम्ही : अब मुझे यहा ऐसी जगह पे दुसरी रिक्षा भी नही मिलेगी

(रिक्षावल्याच्या गालतली खळी बघून तुमच्या डोक्याची शीर चढते तुम्ही मु्काट पैसे देऊन दुसरीच्या शोधात वण वण करता)

तुम्ही: *#@#**$$

 इत्यादी इत्यादी. मुद्दाम दुस-या पात्राचा उल्लेख मी पुरु्षार्थी केलाय कारण मुलींना हे अनुभव कमी येतात.  (पण मुलींनादेखील कधी कधी काही वात्रट रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागतो स्पेशली त्या सगळ्यात जास्त इरिटेट होत असतात त्या रिक्षावाल्यांच्या डोक्यावर लावलेल्या स्पेशली अड्जेस्टेडलांबट आयताकृती आरशांना)
  
जशी हाताची सगळीच बोट सारखी नसतात तसे सगळेच रिक्षावाले काही वर उल्लेख केल्याप्रमाणे नसतातकाही सभ्य, वाहतुकीचे नियम पाळणारे, सर्व पॅसेंजर्स ना समान वागणूक देणारेही आहेत. आणि त्यांचेही चांगले अनुभव आपल्याला येत असतात
 
 
जेव्हा तो अनाम प्रेमचा पोस्टर मी रिक्षा च्या मागे वाचला तेव्हा घरी येऊन गूगल केले की हे अनाम प्रेमकाय प्रकरण आहे? कुठली संस्था आहे की दुसर काहीतरी? तेव्हा मला मुंबई मिरर मधला हा लेख दिसला.

http://www.mumbaimirror.com/index.aspx?age=article&sectid=2&contentid=20100129201001290304295763ecbd1c2

 या लिंक मधे लिहिलेली हिंदीमधली त्रिसूत्री मराठीत अतिरंजित करून भाषांतरीत केली गेली आहे.
त्यात रिक्षावाल्यांच्याही काही जेन्यूईन अडचणी असतात भाड न घेण्यामागे असा एका ड्राइवर ने संगितलय जशा
 
1)रिक्षा मधे इंधन कमी असणे

2)लंच अवर्स 

3)पॅसेंजर ला जिथे जायचय तिथे पार्किंग साठी सुविधा नसणे इत्यादी.

पण अशी कारणं नसतानाही कित्येकदा ते सरळ सरळ नकार देऊन निघून जातात. बर सगळेच पॅसेंजर त्यांना आदरार्थी वागणूक देत असतील अस मला म्हणायच नाही. हो पण रिक्षा वाल्याने जर योग्य ठिकाणी व्यवस्थित नेऊन सोडल तर त्याला नुसत “थॅक्स” म्हणायला आपल काहीच जात नाही. मी स्वतः तस म्हणते (ते पोस्टर पाहायच्या आधी पासून) (प्रोवाइडेड तो रिक्षावला सभ्य वाटला तरच) अगदी बस मधल्या कंडक्टरलाही. तुम्ही म्हणाल थॅक्स कशाला म्हणायला हव ते त्यांच कामच आहे पण दिवसभर अशी वण वण करणार्‍या कंडक्टर किंवा रिक्षावाल्याला थॅक्स म्हटल तर बिघडल तरी कुठे. एक प्रकारच सौजन्य दाखवायच बस…

 पण या अनाम प्रेम संस्थेचे जे कुणी अनुयायी असतील त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी रिक्षा चालकांसाठी ही अस एखाद पोस्टर बनवाव….ज्यात रिक्षा चालकांनी काय कराव आणि काय करू नये याचे उपदेश त्यांनाही द्यावेत. टाळी एका हाताने वाजत नसते.

बाळकडू

नविन वर्षातली ही पहिलीच पोस्ट आणि त्यातही उपदेशाचे बाळकडू पाजणार की काय ही आता अस वाटून घेऊ नका. काही गोष्टी कशा नकळत लहानपणीच आपल्या अंगवळणी पडतात किंवा कायम स्मृतीत राहतात ते सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमच्या घरात ५ ऑगस्ट २०१० ला जेव्हा ’सान्वी’ नामक एक छोटी परी अवतरली तेव्हा आणि त्यानंतर आजतोवर आम्ही सगळेच तिच्या प्रत्येक हालचालीवर, तिच्यावर होणा-या कुठल्याही चांगल्या वाईट परीणामांवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. आमचे मोठे बंधूराज आणि वहिनी बाईच पालक म्हणून न्हवे तर माझे आई वडील आणि आत्या म्हणून खुद्द मी सुद्धा…तिने काय पहाव, काय खाव, काय ऐकाव इत्यादी इत्यादी वरून एक मेकांना सल्ले देत असतो.

आम्ही घरातलीच माणस तिच्या आजूबाजूला कायम वावरत असतो त्यामुळे आमच्या चालण्या बोलण्यातून वागण्यातूनच ती शिकत जाणार आणि तिच्यावर संस्कार होत जाणार, हे अगदी स्पष्ट आहे तेव्हा चुकूनही तिच्या समोर बोलताना (अजून जरी ती पाचच महिन्यांची असली तरी) आमच्या तोंडातून चुकीचा शब्द बाहेर येणार नाही याची खबरदारी घ्यायची. माझे वडील म्हणजे सान्वी चे आजोबा तिच्याशी खेळताना, तिला फ़िरवताना कायम जुन्या मराठी कविता, गणपती स्तोत्र, आरत्या, भक्ती गीत म्हणणार जेणेकरून तिच्या कानावर ते पडाव. ती हॉल मधे असताना शक्यतो टी.व्ही. बंदच ठेवणे से आणि असे बरेच अलिखित पण चांगले नियम रुजू होत आहेत.

 हे असे विचार घोळत असताना मी फ़्लॅशबॅक मधे गेले आणि आठवू लागले कि मला कधीही माझ्या आई-वडीलांनी समोर बसवून गणपती स्तोत्र , श्लोक , आरत्या शिकवल्या नाहीत. (अपवाद हा फ़क्त मनाचे श्लोकांचा आहे कारण त्याची स्पर्धा असायची शाळेत म्हणून अगदी घोकून सर्व पाठ केले होते.) मग मला हे सगळे श्लोक, आरत्या, सुभाषित कशी काय माहीत? आई वडील दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे आमच्या घरात सकाळ ही लवकरच होते..पहाटेच म्हणा हवतर. वडील वॉकला जाउन आले ली आंघोळ करून देवाची पूजा करतात तेव्हा किमान आमच्या कानावर पडतील एवढ्या आवाजात तरी आरती, श्लोक, मंत्र म्हणणार. इथुनच कदाचित आमची शाळा सुरू झाली. लहानअपणीच हे सगळ मला येत होत..अर्थात तेव्हा त्याच अर्थ माहीत न्हवता मला…किंवा वडीलांनी तो समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी कदाचित पूलावरून पाणी गेल असत त्या वयात. सकाळच रेडीओ वर आमची काम व्हायची. म्हणजे आई सकाळी सकाळी रेडीओ वर मराठी वाहीनी लावायची त्यावर अगदी exact वेळ समजायची. आरोग्यम धनसंपदा सारखे ५ मिनिटांचे कार्यक्रम सुद्धा फ़ार छान असायचे. सकाळच मराठी भक्तीगीत, भावगीत, बातम्या अस सगळ कानावर पडत राहयच. तेव्हा टी.व्ही वर पण दोनच वाहीन्या असायच्या. रामायणाच पर्व मला फ़ारस आठवत नाही पण रविवारी सकाळी लवकर उठून, आंघोळ्या करून आम्ही ’महाभारत” बघायला सहकुटुंब बसायचो हे मात्र मला स्पष्ट आठवतय. सकाळी आम्ही शाळेत आणि आई-पप्पा ऑफीसला गेले की पुन्हा भेट संध्याकळी व्हायची तेव्हा रात्रीच जेवण सगळ्यांनी एकत्रच बसून जेवायच हा दंडक आम्ही अजुनही पाळतो. सकाळी आणि संध्याकाळी अगरबत्तीचा सुवास नाकात नाही गेला तर करमत नाही 🙂 यातून मुलांनी आस्तिकच व्हाव किंवा मूर्तीपूजेला प्राधान्य द्याव हा उद्देश्य नसून एखाद श्रद्धा स्थान असाव असा असू शकतॊ कारण हे सगळ आमच्यावर कधीही लादल गेल नाही ते आपोआपच अंगी रूळत गेल. आणि म्हणूनच हे कधीही आम्हाला सक्तीच वाटल नाही.

 घराच्या भाषेचाही लहान मुलांवर प्रभाव पडतो…भाषेवरून एक किस्सा आठवला. एकदा काही ऑफीसमधले कलिग्स आणि मी गप्पा मारत बसलो असताना भाषेचा विषय निघाला आणि माझा एक लखनऊ चा मित्र म्हणाला “मराठी ही खूप रफ़ भाषा आहे. यात आईला, मोठ्या भावाला, मामांना पण एकेरीत हाक मारतात पण आम्ही सगळ्यांच “जी” लावून बोलावतो. आगदी आईला, मोठ्या भावाला किंवा बहीणीला पण अरे-तुरे करत नाही.” लगेच माझा मराठी अभिमान जागृत झाला कि त्याला केवळ काहीतरी उत्तर द्यायच म्हणून मी म्हटल “हम जिनसे ज्यादा स्नेह रखते है उन्हे अरे-तुरे करते है” (माझ्या म्हिंदी (मराठी कम हिंदी) स्टाईल मधे मी उत्तर हाणल) पण मग काय आम्ही वडीलांशी स्नेह ठेवत नाही की काय?? त्यांना तर आम्ही आदरानेच हाक मारतो. हा प्रत्येक भाषा प्रचलित झाली त्या्चाच एक भाग असावा. यात चूक बरोबर ठरवण थोड कठीण आहे. तुलनात्मक फरक हे असायचेच. असो मुळ मुद्द्यापासून भरकतोय आपण.. माझी आई माझ्या आजोबांना (तिच्या वडीलांना) दादा आणि आईला वहीनी म्हणते कारण तिने तिच्या लहानपणी एकत्र कुटुंब पद्धतीत असताना तिच्या काका काकूंनी नेहमी तिच्या आई-वडीलांना त्याच नावाने संबोधताना ऐकल आणि पुढे तेच follow केल. आज अचानक तिला त्यांना आई-बाबा म्हणायला सांगितल तर अवघडल्यासारख होईल.

सांगायचा मुद्दा हा की खरच लहान मुलं म्हणजे ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणेच. यांच्या आजूबाजूच्या लोकांचा, वातावरणाचा नकळत त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. त्यामुळेच कदाचित आज काल गर्भसंस्काराचेपण क्लासेस चालतात म्हणे… तेव्हा आपल्याच वागण्या बोलण्यातून मुलांच्या मनावर कोवळ्या वयात जे बिंबवले जाते तेच त्यांचे बाळकडू असते.

धूर-धडाका

दिवाळी सण म्हटला कि अगदी २३ आठवडे आधीपासूनच आपण सर्व हा सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून तयारीला लागतो. घराची साफसफाई. नवीन कपड्यांची खरेदी, फराळाची रेलचेल, सोनेचांदीची खरेदी, कन्दील, दीपमाळ, पणत्या, सुगन्धी उटणे, रांगोळी इत्यादी इत्यादी….आणि हो फटाके

दिवाळी म्हणजे “Festival of lights”. तमसो मां जोतिर्गमय असा संदेश देत सर्व जन मानसांमध्ये चैतन्य आणि उत्साह घेउन येणारा असा हा सण. पण कानठळ्या बसवणारे फट्याकांचे आवाज , जीव गुदमरून जाइल इतकी फ़टाक्यांच्या धूराने प्रदूषित झालेली हवा आणि त्यामुळे वाढलेले तापमान या सणाच्या मांगल्याला गालबोट लावते असे मला वाटते.

लहान मुलांची हौस मौज म्हणून पालक पिशवी फ़ाटेल इतके फटाके खरेदी करून देतात. मुले अजाण असतात आणि या प्रकारातच दिवाळीचा आनंद लुटता येतो असा त्यांचा समज होतो. किंवा अगदी समर्पक बोलायच म्हणजे माझे सगळे मित्र फटाके लावतात मग मीच का नाही?” मुलांच्या  या निरागस हट्टापुढे मात्रा चालेना कुणाचीपण मुलांमधे आणि पालकांमधे देखिल या संबंधित थोडी जाग्रुती व्हायला हवी. महागडे फटाके उडवून पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा वृक्षारोपण करून त्याची वृद्धी करणे हे केव्हाही एक constructive कार्य आहे. पालकांनी असे विचार मुलांमधे अजाण वयापासूनच रूजवायला हवेत.

फटाक्यांचे आवाज अगदी १०० ते १४० डेसिबलच्या वर जातात हे किती भयंकर आहे. माझ्या ३ महिन्याच्या भाचीची ही पहिलीच दिवाळी म्हणून मोठ्य़ा उत्साहाने आम्ही ती साजरी करायची ठरवली. खूप पाहुणे, मित्र परिवार सुद्धा तीला पाहण्याच्या निमित्ताने दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घरी आले. पण तीने म्हणावी तशी सणाची मजा लुटली नाही. सारख्या येणाया फटाक्यांच्या आवाजाने ती दचकून जागी व्हायची आणि आमच्या घरात फटाक्यांच्या आवाजासोबतच तिचा high pitch volume पण घुमायचा. 😉

सण असूनही आम्हाला खिडक्या , बालकनीचे दरवाजे लाउन घ्यायला लागत होते कारण इतका प्रचंड फटाक्यांचा धूर आणि त्यांच्या दारूचा वास यायचा की त्यामुळे आम्हालाच कसेनुसे व्हायचे तर त्या कोवळ्या जीवाची काय कथा?

घरातून खाली डोकावून पाहिले तर पालक आपल्या (अगदि ४ ते १० वयोगटातील) मुलांना घेउन फटाके फोडत असायचे. आता या वयोगटातील मुलाला बॉम्ब , १००-१५० ची लवंगी माळ या अशा अस्त्रांची काय बर तोंड ओळख….पण मुलांचे पालक मात्र आपण जबाबदार असण्याच्या अविर्भावत मुलांचा हाथ पकडून वातीला अगरबत्ती लावायचे… आवाज न करणारे अजून एक हिंस्त्र अस्त्र म्हणजे रॉकेट.. माझ्या एका मित्राने एक किस्सा सांगितला. दिवाळीत त्याच्या बैठया घराच्या खिडकिमधे रॉकेट अडकून बसले होते. आम्ही म्हटल तु झापल का नाहीस मुलांना कारण जर ते खिडकीत न अडकता सरळ घरात आले असते तर?? तर तो म्हणाला “लहान मुलगा असता तर थोडासा दम दिला असता पण पन्नाशी ओलंडलेल्या ग्रुहस्थाला मी काय शहाणपणा शिकवू?” 😉

भाऊबीजेच्या दिवशी आम्ही गाडी घेऊन बाहेर गेलो होतो. एका गल्लीत आल्यावर १०-१५ सेकंदान्नी गाडीचा ब्रेक दाबावा लागत होता. मुले रस्त्यावर फटाके लावत होती. आणि तेही मोठ-मोठे. या अशा प्रकारामुळे अक्सिडेंट व्हायची केवढी मोठी शक्यता असते? अस म्हटल्यावर माझे वडील म्हणाले की या मुलांना कुठे तुमच्यासारखी कॉम्प्लेक्स मधली गार्डन्स आहेत फटाके फोडायला तेव्हा ती रस्त्यावर फोडून आपली दिवाळी साजरी करतात. तेव्हा आपणच जपून गाडी चालवायला हवी. मला काही हे फारस पटल नाही…मी पुन्हा मुळ प्रश्नाकडेच वळले…की मुळात “फटाके उडवूनच दिवाळी साजरी व्हायला हवी का?”

म्हणजे दिवाळीत करायच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे “अभंग्यस्नान , रोषणाई, फराळ, रांगोळी इत्यादी इत्यादी यांना त्याच त्याच एक महत्व आहे किंवा काही कारण आहेत जी convincing आहेत. पण “फटाके” या प्रथेच काय कारण आहे?? हे मला अजुनही उमगलेल नाही.

कुणी एका सिने नट जोडप्याने म्हणे दान म्ह्णून क्रेट भरून फटाके गरीब मुलांमधे वाटले. किती उथळ संकल्पना आहे ही?? त्या ऐवजी काही पौष्टीक खाण, चांगके कपडे किंवा पुस्तके अस काही वाटता आल नसत का?

मोठ्या माणसांना चार समजूतीचे शब्द सांगयला जाव तर ते आपल्यालाच अक्कल शिकवतील (काही अपवाद वगळता 🙂 ) त्यापेक्षा कोणती गोष्ट constructive आणि कोणती distructive याचे धडे लहान मुलांना द्यायला हवेत. कारण तेच पुढची पिढी घडवणार आहेत.

तेव्हा किमान पुढच्या दिवाळीला तरी काही लोकांनी बोध घेऊन प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने पाऊले उचलावीत आणि आपल्या बरोबरच इतरांनाही ह्या सणाचा आनंद लुटू द्यावा अशी आशा करूया.